Skip to main content

गुरुपोर्णिमा


मी आज जरा कंटाळूनच ऑफिस मधून आले .खूप थकायला झाले होते घरात यायचा अवकाश फोनेची बेल वाजायला सुरवात झाली नाइलाजाने मी फोन घेतला "काकू मी अविनाश बोलतो आहे .तुम्ही आहात न मी येतो:"

मी हो म्हणाले खरेतर कंटाळले होते कोणी येऊ नये असे वाटत होते पण अविनाश येणार होता . मी घराच्या कपड्यातून परत साडी नेसली देवापाशी दिवा लावला एका बाजूला खिचडी भाताची टाकली व शिरा साखरेचा केला तेव्हड्यात बेल वाजली .

अविनाश हातात फुलांचा बुके घेऊन आला होता. त्याने मला वाकून नमस्कार केला ,बुके दिला काकू आज सर ,गुरु नाहीत तर निदान गुरु माउलीला तरी नमस्कार करून येऊयात म्हणून मी आलो .मला वाटले तो सहज येणार होता त्याच्या लग्नाला मी मनात असून सुद्धा जाऊ शकले नव्हते त्याबद्दल मनात कोठेतरी खंत वाटत होती .त्याला शिरा दिला चहा करू का विचारले या शीरयाची चव जाईल म्हणाला.

आज सरांची कृपा आहे काकू मी खूप शाळांमधून आणि क्लास मधून आता कराटे शिकवतो .मला जे ज्ञान सरांनी दिले आहे ते इतके भरभरून आहे कि कोणी आत्ता माझ्याशी बरोबरी नाही करू शकणार मला सरांनी घडवले आहे .त्याच्या डोळ्यात त्याच्या सरांनबद्दल चा अभिमान दिसत होता .येतो काकू म्हणून तो गेला .

माझ्याडोल्यांसमोर सर्व भूतकाळ आला .लग्न झाले आम्ही एका वन रूम किचन मध्ये संसार सुरु केला .त्यावेळी माझे पती कराटे शिकत होते .नंतर क्लास पण सुरु केले पण ते हाडाचे शिक्षक होते .खूप वेळ क्लास चालायचे मग सर्व सर आणि मुले /मुली घरी यायच्या मग खाणे दंगा व्हायचा नेहमीचे झाले होते. हे घर लहान त्यात माझ्या शिफ्ट असायच्या थोडा वेळ पण आराम करता यायचे नाही माझी चीड चीड व्हायची आणि मी म्हणायचे जीवाचे रान करून शिकवता जरा थोडी फी तरी घेत जाना फुकट शिकवलेकी त्याची किंमत राहत नाही आणि माझ्या मुलांना व मला वेळ न देता सर्व त्या मुला/मुलीना देता काय उपयोग? ह्यावर माझा नवरा हसायचा मी म्हणायची तुम्ही युनिव्हर्सल बाबा आहात ना टोमणे मारायची पण ह्यांनी कधीच नाराजी दाखवली नाही हळूहळू मला कळायला लागले कि हे खरे शिक्षक आहेत मग नकळत मी ह्या सर्वांमध्ये रमायला लागले .त्याच्या स्पर्धा असल्या कि त्यांना प्रोच्छाहन द्यायला जायला लागले शनिवार रविवारी त्यांचे बरोबर धरणावर काहीतरी खाऊ कधी पोहे,कधी हिंदुस्तान बेकरिचे प्याटीस मग त्यांचा निसर्गाच्या सानिध्यात क्लास मग पोहणे मग खाणे असा आमचा कारेक्रम असायचा

कधी कधी मुले माझ्या बरोबर गप्पा मारायची सल्ला विचारायची अडचणी सांगायची .मी विचार करायला लागले खरच माझ्या आयुष्यात मला आई वडील बहिण भाऊ शाळेतले गुरु महाविद्यालयातील गुरु सोडून किती गुरु भेटले

पहिला नंतरचा गुरु म्हणजे माझा नवरा त्याने मला काय शिकवले नाही असे काहीच नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी तून पण खूप काही शिकवले त्याने मला.नंतर माझी मुले .मी आजाराने कंटाळले होते सतत रडणे उदास होणे ह्यापेक्षा दुसरे काहीच करत नव्हते माझ्या दुखण्याने मला संशयी ,जेलस ,चीड चीड सर्व काही केले होते पण मुलांनी खूप शिकवले वेळप्रसंगी माझ्या मागे ढाली सारखे उभे राहिले होते इतके छोटे असून त्यांनी मला दिलेली शिकवण लक्षात राहिली. मुले म्हणायची आई जगात तुझ्या पेक्षा खूप दुख्खी लोक आहेत तू त्यांचेकडे बघ .घरातून बाहेर पड स्वतःच्या कोशात अडकू नकोस .माझे पोटाचे दुखणे झाले तेव्हा काहीही संबंध नसलेली मामी मला घाई घाईत डबा आणून द्यायची सतत हसत असायची ,१ ना २ माझे घर सांभाळणारी, मी पैसे देऊ केल्यावर माझ्या प्रेमाची किमंत करू नका म्हणणारी मी बरी व्हावी म्हणून दगडू शेट गणपतीला नवस करणारी मुकता, माझ्या जवळ हॉस्पिटल मध्ये कोणी नसताना मला औषधे आणून देणारा वार्ड बॉय, मला हाताला धरून वाशरूम मध्ये घेऊन जाणारे पेशंटचे नातेवाईक ,माझी काहीही ओळख नसताना माझे हाल बघून बस मध्ये माझे समान घेऊन उभ्या राहणाऱ्या भोसरी बस मधील बायका मला पायांचे हाल बघून भोसारीपासून फक्त १० रुपयात घरापर्यंत सोडणारे दादा लग्नानंतरलगेच मला opration करायला लावणारी, मला मानसिक सपोर्ट करणारी माझी सून वेळी अवेळी मला डबा घेऊन येणारे माझे व्याही ----

मला रेकी शिकवणारे गुरु बागवे म्याडम ,शेंडे काका ,माझे भाऊजी.

हे सर्व माझे एका सेकॅन्दासाठी , मिनिटासाठी,तासासाठी,दिवसांसाठी आणि आयुष्य साठी आलेले गुरूच ना

ह्या सर्व गुरुंना गुरुपोर्णिमे निमित्त माझे प्रणाम .

अविनाश तुझे आभार कारण तू मला याची आठवण करून दिलीस.



  • Comments